राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले.
उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत स्वत:चे घर सोडून दुसरा उमेदवार चालू शकत नाही का, असा सवाल करत गळ्यापर्यंत आल्यावर अस्मिता आठवली. जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे सुभाष पाटील यांनी म्हणाले.

वसंतदादा पाटलांचे शिक्षण चौथीपर्यंत होते. ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले नव्हते. मात्र, त्यांना शेती, शेतकरी, कारखानदारी समजली होती. आपल्याकडे वडिलांनी वांबोरीत काढलेला कारखाना मुलगा चालवतो. तुमचे स्वत:चे कर्तृत्व काय, असा सवालही पाटील यांनी केला.बाळासाहेब गाडे, शिवाजी सागर, ज्ञानदेव क्षीरसागर यांचीही भाषणे झाली.
- अंबानी कुटुंबाला रिलायन्समधून किती पगार मिळतो?, लाखो नव्हे कोटींमध्ये जातो हा आकडा!
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; जून महिन्याचा हफ्ता जमा होतोय, पण जुलैचा हफ्ता कधी ? समोर आली मोठी अपडेट
- हृदयाच्या आरोग्यासाठी अमृत आहेत ‘या’ देसी गोष्टी, कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने कमी करतात!
- Bank Of Baroda च्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर
- श्रावण महिन्यात ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन का टाळले जाते?, जाणून घ्या शास्त्रीय कारण!