रत्नागिरी : निवडणुकांच्या निकाल जाहीर होण्या आधीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय कदम हे खेड दापोलीचे उमेदवार आहेत. संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही समर्थक खेड येथे जमा झाला. त्यानंतर त्यांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र तरीही ही मिरवणूक बंद न करता ती सुरु होती. यामुळे संजय कदम यांच्यावर पोलीस चांगलेच संतापले. त्यांनी ताबडतोब ही मिरवणूक रद्द करायला लावली.
मात्र त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी ही मिरवणूक पुन्हा सुरु केली. दरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 2008 ते 2025 दरम्यान सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 बॉलीवूड चित्रपट; पाहा यादी!
- बिजनेस ठप्प झालाय, पैशांची आवकही थांबलीये?’हा’ वास्तु उपाय तुमचं नशिबच बदलेल!
- घरबसल्या फक्त 2 मिनिटांत कळणार ₹2000 खात्यावर आलेत की नाही?, ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी!
- 6000mAh बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि 64MP कॅमेरा! अवघ्या 12,999 रुपयांत खरेदी नेटवर्कशिवाय चालणारा भन्नाट स्मार्टफोन
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘ह्या’ 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, कुठून कुठपर्यंत धावणार? पहा..