अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.

केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केली लाकडी दांडक्याने मारहाण, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
- आज आणि उद्या राज्यातील शिक्षकांची शाळा बंद आंदोलन, पण शाळेला सुट्टी राहणार नाही, शिक्षण विभागाचा नवा आदेश
- अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तर दुबार पेरणीचे संकट टळले
- सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ! 8 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत, महाराष्ट्रातील 18, 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा…
- तोंडातील दुर्गंधीसाठी महागडे माऊथ रिफ्रेशर सोडा, घरच्या घरी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय! दिवसभर राहाल अगदी ताजेतवाने