संगमनेर | भाजप विधिमंडळाच्या नेता निवडीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आल्यासरशी त्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात जात शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, असा टोमणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मारला.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून तांबे यांनी आपल्या टि्वटर आणि फेसबुकवर हात जोडत आणि पाया पडत ही मागणी केली. मागणी मान्य करुन घेण्यासाठी आमच्याकडे आंदोलनाचाही मार्ग आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

कृषिमंत्र्यांनी कृपया परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतांना आणि शेतकऱ्यांना भेटी द्यावी, तसेच भेटीअंती तत्काळ मदतदेखील द्यावी, असे नमूद करत नुकसानीचे फोटोदेखील तांबे यांनी फेसबुकवर टाकले आहेत.
- अंबानी कुटुंबाला रिलायन्समधून किती पगार मिळतो?, लाखो नव्हे कोटींमध्ये जातो हा आकडा!
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; जून महिन्याचा हफ्ता जमा होतोय, पण जुलैचा हफ्ता कधी ? समोर आली मोठी अपडेट
- हृदयाच्या आरोग्यासाठी अमृत आहेत ‘या’ देसी गोष्टी, कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने कमी करतात!
- Bank Of Baroda च्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर
- श्रावण महिन्यात ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन का टाळले जाते?, जाणून घ्या शास्त्रीय कारण!