राहाता :- तालुक्यातील गोगलगांव येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.
रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता.

त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
- रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये कोण काय भूमिका साकारणार? बजेट, रिलीज डेट, सगळी माहिती वाचा येथे!
- पुढील २५ वर्ष तुमच्या मुला-बाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही- माजी खासदार सुजय विखेंची शेतकऱ्यांना ग्वाही
- दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाऐवजी मोबाईल वापरण्याकडे वाढलाय कल, पालकांमध्ये चिंतेच वातावरण
- Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?
- ज्या तत्परतेने नागरिकांचे अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही? आमदार हेमंत ओगलेंनी सभागृहात सरकारला धरले धारेवर