नवी दिल्ली : २०१७ मध्ये देशभरात ८१२९ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. यात १४८८ लोक महाराष्ट्रातील, तर ९६८ लोक हे मध्यप्रदेशातील होते, अशी माहिती मिळते. यावरून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लोक आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर मध्यप्रदेशचा नंबर लागतो, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमधून पुढे आली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमध्ये मध्यप्रदेशात ७०७ महिलांनी आत्महत्या केली आहे, तर पुरुषांची संख्या २६२ इतकी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ९५१ महिलांनी आत्महत्या केली आहे, तर पुरुषांची संख्या ५३७ आहे. २०१६ मध्ये देखील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातच जास्त आत्महत्या केल्या होत्या. यात महाराष्ट्रातील ७६८ आणि मध्यप्रदेशातील ५६५ महिलांनी स्वत:चे जीवन संपवून घेतले होते.
वर्ष २०१७ मध्यप्रदेशातील ५९ लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले; परंतु समजूत काढून त्यांचे जीव वाचवले होते. एनसीआरबीनुसार, मध्यप्रदेशात असफल आत्महत्येचा दर १.२ टक्के आहे आणि देशात तिसऱ्या स्थानावर आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे
- सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सुरू राहणार वादळी पाऊस, डख नेमके काय म्हटलेत ?
- Ahmednagar Politics : विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले ? शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका !
- National Insurance Academy : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…
- Naval Dockyard Mumbai Bharti : 8 वी, 10 वी आणि ITI उत्तीर्णांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; फक्त करा ‘हे’ काम!