अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण पंचमुख (वय २१), सुरज रमेश पंचमुख (वय १९, दोघे रा. साईराम सोसायटी, कल्याण रोड) व प्रशांत बलभीम गावडे (वय १९, रा. भावनाऋषी सोसायटी) हे आपसात हाणामारी करताना आढळून आले.
पो.कॉ.शहीद शेख यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 5 जुलैला चालवली जाणार एक नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘ह्या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- पैसे कमावायचे असतील तर श्रीमंत लोकांच्या ‘या’ सवयी आजच अंगीकारा; आयुष्य बदलून जाईल!
- पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण दरम्यान लोकल ट्रेन सुरु होणार ? सरकारची भूमिका काय ?
- श्रीरामपूर तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांच्या शेतातून चोरले दोन गुंठे गवत
- Jackfruit Day : हाय ब्लड प्रेशर, पचन ते हृदयरोग… फणसाचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या!