श्रीरामपुर: तालुक्यातील कमालपूर येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी सायंकाळी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धिर दिला.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आलेल्या दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट होते. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कमालपूर मधील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सोयबीन, कापूस, बाजरी, मका यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

या व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी गावातील युवक तसेच शेतकरी वर्गाशी संवाद साधला. नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे अनेकजण दिवाळीनिमीत्त गावी आलेले होते. त्यांच्याशीही विविध विषयांवर मुरकुटे यांनी चर्चा केली.
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्रातून धावणार नवीन एक्सप्रेस ! राज्यातील ‘या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- अहिल्यानगरमध्ये पैश्यांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला लावली पिस्तुल तर बायकोचाही केला विनयभंग, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल