हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय.
कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. कोदाद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्कल निरीक्षक शिवा राम रेड्डी यांनी ही माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तीन वऱ्हाडी जखमी झालेले होते. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानतर दोन्ही बाजूचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये आले. अजय आणि इंद्रजा या जोडप्यामध्ये कुठलेही वाद नसून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळे आम्हाला तक्रार नोंदवायची नाही, असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.
- इंजीनियरिंगला ऍडमिशन हवंय ? स्वातंत्र्यापूर्वी स्थापित झालेल्या ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी
- ‘या’ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर मिळणार 9.10 टक्क्यांचे व्याज ! कोणत्या बँकेने आणली नवीन योजना? वाचा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! यावेळी ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, थकबाकीचाही लाभ मिळणार
- एलपीजी ग्राहकांसाठी कामाची बातमी! आता ‘या’ ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाही
- मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?