जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली.

आदिती तलावात पाणी काढण्यासाठी उतरली असता तोल जाऊन पाण्यात पडून बुडायला लागली. काठावर उभ्या असलेल्या भावंडांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी आदितीला तलावातून बाहेर काढले, मात्र तिचा मृत्यू झाला.
दुसरी घटना शेतकरी बाबासाहेब भिमराव डोके (४५ वर्षे) यांनी घरात कोणी नसताना समोर असलेल्या सिमेंटच्या कॉलमला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिसऱ्या घटनेत शनिवारी रात्री शहरातील बसस्थानकात घडली. पुणे – बीड (एमएच ०६, बीडब्ल्यू ०९४०) या शिवशाही बसचा चालक गाडी पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
- मुकेश अंबानी यांचे अँटिलिया नाही तर ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक महागडे घर ! 400000000000 रुपयांच्या सर्वाधिक महागड्या घराचा मालक कोण?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 25,000 रुपयांची गुंतवणूक करा मॅच्युरिटीवर मिळणार 6 लाख रुपये !
- पुण्यात तयार होणार 3 नवीन रस्ते ! हिंजवडी आणि मुळशीमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, कसे असणार नवीन रोड ?
- अहिल्यानगर पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई ! मावा तयार करताना पकडला गेला, पण झाला फरार!
- शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल ! नव्या अलाइनमेंटला मुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल