उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तातडीने बिलग्राममधील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी)मध्ये दाखल करण्यात आले.

रविवारी सकाळी लक्ष्मीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या हाताला पाचऐवजी सहा-सहा बोटे होती; परंतु रुग्णालयातील परिचारिका विद्यादेवीने बाळाचे एक-एक बोट कापून टाकल्याचा आरोप लक्ष्मीचे पती रवींद्र यांनी लावला. बोट कापल्याने बाळाची प्रकृती खालावली; परंतु रुग्णालयाने त्याकडे कानाडोळा करत आई व बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली.
- भारतातील गावांपेक्षाही लहान, ‘हे’ आहेत जगातील सर्वात लहान 7 देश! पण श्रीमंती, सौंदर्य आणि पर्यटनात सर्वात पुढे
- कोणतंही कर्ज न घेता खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा 5/20/30/40 फॉर्म्युला!
- प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केली लाकडी दांडक्याने मारहाण, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
- आज आणि उद्या राज्यातील शिक्षकांची शाळा बंद आंदोलन, पण शाळेला सुट्टी राहणार नाही, शिक्षण विभागाचा नवा आदेश
- अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तर दुबार पेरणीचे संकट टळले