अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली.
उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दिवाण आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, मालमत्ताधारकांशी चर्चा झाली आहे. शासनाने अधिग्रहण केले, तर मालमत्ताधारकांचे २५ टक्के आर्थिक नुकसान होणार होते. मालमत्ताधरकांनी जर हमीपत्र भरून दिले, तर हे नुकसान टाळता येणार आहे. त्यामुळे मी चर्चा केली.
उड्डाणपुलाच्या संपादनात सुमारे २१ जणांची ४ हजार ६५५ चौरस मीटर जागा बाधित होणार आहे. शासकीय जागा २८८८ चौरस मीटर आहे. याव्यतिरिक्त लष्कराच्या हद्दीतील सुमारे ६७०० चौरस मीटर जागाही संपादित करावी लागणार आहे. तातडीने पुलाचे काम सुरू करण्यासाठी बायपासचेही मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
मी का वाईट होऊ ?
नगरचे राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे सगळेच आतून गोड आहेत. त्यामुळे मी तरी कशाला वाईटपणा घेऊ, असे वक्तव्य करत अंतर्गत विरोधकांनाही डॉ. सुजय विखे यांनी टोला लगावला.
- जपानी लोक इतके शांत आणि यशस्वी का असतात?, नेमकी कशी असते त्यांची ‘शुकन’ लाईफस्टाइल?
- पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग मोहरीच्या तेलात ‘ही’ एकच गोष्ट मिसळून लावा! त्वरित होईल फायदा
- ‘या’ दोन मूलांकच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये, आयुष्य उद्ध्वस्त करून बसाल!
- ना जहाज, ना विमान…चीननं बनवलं सागरी युद्धासाठी भयानक शस्त्र! चीनचं ‘एक्रानोप्लान’ भारतासाठी नवं संकट?
- मुघल दरबारात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण?, UPSC मध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितेय का?