जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वात कधीही तडजोड केली नाही. त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांच्या वक्तव्याला मीच काय, पण कुणीही महत्त्व देत नाही. संकट काळात आपण कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलो. कायम पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात आला नाही. अडचणीच्या काळात काम केले आणि करत राहणार आहे.

उलट मागील साडेचार वर्षांत पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी कसा पक्ष वाढवला, कसे पक्षविरोधी काम केले, हे जनतेला माहिती आहे. आता जिथे गेले, तिथे त्यांनी अल्पावधीत मित्र वाढवले आहेत. ही त्यांची जुनी कार्यपध्दत आहे.

आता सत्ता नाही, विरोधी पक्षात असल्यामुळे ते काहीही बोलतील. अनेक लाटा आल्या, पण काँग्रेसचा विचार हा देशाच्या विकासासाठी शाश्वत असल्याने तो कायम टिकून आहे. कर्जमाफीच्या निर्णयामध्ये कोणत्याही किचकट अटी नसून सरसकट २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

नियमित कर्जफेड करणारे व २ लाखांपुढील शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार काम करत आहे. राज्यात जिल्हा परिषदांसाठी महाविकास आघाडी एकत्र काम करणार आहे.नगर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल, असा विश्वासही मंत्री थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment