तीन तिघाडी आणि काम बिघाडी – माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी : राज्‍यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच  सरकारचा  प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ आशी सरकारची आवस्था झाली  आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर असून, शेतक-यांपेक्षा ‘सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक’ असल्याची खोचक टिका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी  केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी  आमच्या शुभेच्छा कायम आहेत. पण मूळ विषयाला  बगल देण्याचे काम सरकारने थांबविले पाहीजे. अतिवृष्टीचे २५ हजार रूपये शेतक-यांना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करून, सातबारा कोरा करण्‍याचा शब्‍दही हे सरकार विसरले आहे. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्यानेच राज्यात पुन्हा शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या असल्‍याकडे आ.विखे यांनी माध्‍यमांचे लक्ष वेधले.

घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून  सरकारने लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पण या सरकारकडून जनतेची अडवणूकच सुरू असून मुख्यमंत्र्याचा रिमोट कोण चालवतय यापेक्षा राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ आशी सरकारची आवस्था झाली असून, सरकारला शेतक-यांपेक्षा नाईट लाईफचीच चिंता अधिक असल्याची खोचक टिका त्यांनी केली.

माजी मंत्री पंकजा मुंढे यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना विखे यांनी सांगितले की,मागील सरकारच्या योजना बंद करून या सरकारला पुढे जाता येणार नाही. गोदावरीचे खोरे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या भागातील पाणी प्रश्नासाठी कायमच संघर्ष झाला. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी याबाबत सातत्याने भूमिका मांडली, पण विखे पाटलांना पाणी प्रश्नाचे  श्रेय मिळेल म्हणून जे विरोध करत होते तेच आता या प्रश्नावर एका सूरात बोलु लागले आहेत.

गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरून काढली तर नगर, नासिकसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे सूचित करून विखे म्हणाले की, पाणी प्रश्नावरून प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मागील सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या खो-यात वळविण्याच्या संदर्भात घेतलेल्या  निर्णयाची तातडीने  अंमलबजावणी करावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

Leave a Comment