पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : नगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नगरकरांना पाणीपुरवठा केला जातो, ही योजना चालवण्यासाठी मनपाला वर्षभरात २४ ते २५ कोटी खर्च येतो.

त्यातुलनेत वसुलही अपुराच होत असल्याने योजनेवरील खर्च भागवणे मनपासाठी अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ स्थायीकडे सुचवली आहे. मनपाच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित आहे. त्यानुसार अंदाजपत्रकासाठी प्रशासकीय बैठकांना पुढील आठवड्यापासून गती येणार आहे.

नगर शहराला ३५ किलोमिटर अंतरावर असलेल्या मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दूरवरून पाणी पंपिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दरमहा दीड ते दोन कोटी वीजबिलाचा खर्च आहे. मनपाकडे स्वउत्पन्नाची साधने अपुरी आहेत. दहा ते पंधरा वर्षांपासून करवाढही झालेली नाही.

मनपाने वीजबिलापोटी कोट्यवधींच्या थकबाकीचा भरणा अद्याप महावितरणला केलेला नाही. महावितरणकडूनही वारंवार थकबाकी भरण्यासाठी मनपाला नोटिसा बजावण्यात येत आहेत. दरवर्षी अंदाजपत्रकात करवाढ करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून पाठपुरावा केला जातो. परंतु, १९ फेब्रुवारीपूर्वीच अंदाजपत्रकाचा विषय मार्गी लागावा यासाठी मनपाने करवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment