काँग्रेसच्या नेत्याने केली मुलाची गोळी झाडून हत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोला: वडिलांच्या तक्रारीवरूनच आपल्याला पोलिसांनी तडीपार केले, अशा संशयावरून मुलाने वडिलांशी वाद घातला. दोघांत झालेल्या झटापटीत वडिलांनी मुलावर बंदुकीतून गोळी झाडली. त्यात मुलाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे मुलगा गुंड प्रवृत्तीचा असल्याने कुटुंबीय त्याला त्रस्त होते. ही घटना अकोल्यातील जठारपेठेत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

मनीष भारती (४०) असे मृत मुलाचे नाव आहे. तर हिरालाल ऊर्फ बाबा उत्तम भारती (७१) असे आरोपी वडिलाचे नाव आहे. बाबा भारती हे एकेकाळी काँग्रेसचे नेते होते. मनीष भारती हा व्यसनाधीन व गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर खंडणी, हाणामारी, प्राणघातक हल्ले अशा अनेक तक्रार पोलिस ठाण्यात आहेत.

दोनच दिवसांपूर्वी त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आपल्याला तडीपार केले, अशा संशयावरून तो सोमवारी वडील राहत असलेल्या ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये गेला.

हातात चाकू घेऊन तो वडिलांना शिवीगाळ करू लागला. बापलेकांत झटापट झाली व त्यातच वडील बाबा भारती यांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्यातच मुलगा मनीषचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार विशाल नांदे करीत असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment