बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नागपूर – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी केली.

अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात यावा, असे तोगडिया म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था आज ढासळली आहे. योग्य व्यक्तीच्या हातात अर्थव्यवस्थेची सूत्रे असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती, असे ते म्हणाले. भाजप सर्वांच्या दृष्टीने अस्पृश्य पक्ष होता. कोणीही जवळ करायला तयार नसतानाच्या काळात शिवसेनेने भाजपला साथ दिली.

त्यामुळे शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मागितल्यानंतर भाजपने ते मोठ्या मनाने द्यायला हवे होते. ते न देऊन भाजपने चूक केली, असे ते म्हणाले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment