अहमदनगर मध्ये शिवभोजन साठी होतोय इतक्या हजारांचा खर्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- 26 जानेवारीपासून नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त हॉटेल, माळीवाडा बसस्थानकातील हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र, मार्केट यार्ड येथील आवळा पॅलेस, तारकपूर बसस्थानकाजवळील अन्‍नछत्र व जिल्हा रुग्णालय येथील कृष्णा भोजनालय येथे शिवभोजन थाळ्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

नगर शहरातील पाचही ठिकाणी शिवभोजन केंद्रांना प्रतिसाद मिळत आहे. शासनाला दररोज 700 थाळींसाठी  तब्बल 28 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

गोरगरिब व गरजू व्यक्‍तींसाठी दहा रुपयांत थाळी उपलब्ध केली. परंतु या थाळीचा आस्वाद सध्या मध्यमवर्गीय नागरिकच मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत.

झोपडपटी भागात देखील शिवभोजन केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गोरगरिब आणि गरजूंना स्वस्तदरात अन्‍न उपलब्ध व्हावे, यासाठी महाआघाडी सरकारने दहा रुपयांत एक थाळी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.

शहरातील पाचही केंद्रांवर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत गर्दी होत आहे. 10 रुपये अदा केल्यानंतर दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी दाळभात व एक वाटी सुकी भाजी असलेल्या थाळींवर गोरगरिब जनतेबरोबरच मध्यमवर्गीय देखील ताव मारताना दिसत आहेत.

शिवभोजन केंद्र चालविणार्‍या मालकांना एका थाळीपाठीमागे 40 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. शिवभोजन केंद्रांवर दररोज 700 थाळ्यांचे वाटप होत आहे.

एका थाळीला 40 रुपये या प्रमाणे शासनाला शिवभोजनावर दररोज 28 हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. शिवभोजन केंद्र चालकांना दर पंधरा दिवसांनी बिले अदा केली जाणार आहेत. शासनाकडून पहिल्या टप्प्याात 25 लाख 20 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment