संघर्ष आणि आरोप हे आपल्याला नवीन नाही – आमदार राधाकृष्ण विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आपण आतापर्यंत तालुक्यातील अनेक नेत्यांशी संघर्ष केलेले आहेत. त्यामुळे संघर्ष आणि आरोप हे आपल्याला नवीन नाही. आपल्या संपर्क कार्यालयाच्या निमित्ताने आपल्यावर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला जात आहे.

मात्र, जे हा आरोप करतात ते आपले जुने लाभार्थी आहेत. त्यांना अजून आपले आक्रमण आणि अतिक्रमण माहीतच नाही. त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते मी बघतो, तुम्ही काम करीत रहा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देत श्रीरामपूरचे आपले जनसंपर्क कार्यालय हे विकास कार्यालय व्हावे असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.

श्रीरामपुरात मंगळवारी सायंकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिक गजाधर वानखेडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,

माजी आमदार चंद्रशेखर कदम, रावसाहेब साबळे, माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, सभापती संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, सुरेश कर्पे, जलीलभाई पठाण, प्रकाश चित्ते, सुनील मुथा आदींसह अनेक नगरसेवक, पंचायत समिती, जि.प. सदस्य उपस्थित होते.

आमदार विखे म्हणाले, श्रीरामपुरात आपण संपर्क कार्यालय सुरू केले ते राजकारणासाठी नाही, तर जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक प्रश्न एकाच ठिकाणी सुटणार आहेत. त्यामुळे प्रश्न अनेक उत्तर एक, असा वसा घेऊन काम करणार आहे.

प्रकाश चित्ते म्हणाले, श्रीरामपूरच्या जनतेच्या मनात अस्वस्थता आहे. येथे मुली, शिक्षक, डॉक्टर यांच्यासह जनता असुरक्षित झाली आहे. गुन्हेगारी वाढत चालली आहे. जमिनी बळकाण्याचे प्रकार घडतात, पक्षाच्या नावाने कार्यालय सुरू झाले असते. मात्र, विखे यांच्या नावात दम आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment