कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरता १० हजार कोटींचा निधी आकस्मिकता निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे.

सध्या आकस्मिकता निधीची मर्यादा १५० कोटी इतकी आहे. या मर्यादेत १० हजार कोटींची तात्पुरती वाढ करून ती आता १० हजार १५० कोटी इतकी करण्यात येईल.

कर्जमुक्‍ती योजना २२ फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. ५ मार्चपर्यंत या योजनेसाठी १० हजार कोटींची आवश्यकता असल्याने आकस्मिकता निधीतून अग्रीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्‍यान, काही दिवसांपूर्वीच राज्‍यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतक‍ऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली.

त्यानंतर या कर्जमाफीसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडून कार्यक्रम खर्चाच्या योजनेंतर्गत असलेल्या निधीपैकी ३०० कोटींचा निधी कर्जमाफीसाठी वळवण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment