एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याबाबतच्‍या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सरकारमधील घटक पक्ष करत असलेला विरोध आश्चर्यकारक आहे.

यावरून महाविकास आघाडीतील विसंवाद सुरूच असून एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

शिवसेना व काँग्रेसचा रिमोटच आता दुसऱ्याच्या हातात गेल्याने ते सांगतील त्याच पद्धतीची विधाने केली जाताहेत. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेल्या भीतीबाबत विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे.

यापूर्वी विरोधी पक्षनेता असताना हीच भूमिका आपण घेतली होती. मात्र, आज वेगळी मते मांडणाऱ्या लोकांना या विषयाचा पान्हा फुटला आहे. यापूर्वी या विषयाबाबत हीच मंडळी गप्प बसली होती, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment