कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी ‘त्या’ पोलिसांना नोटिसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्युप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेतील १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच गिरवले यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी न्यायालयाकडे दाद मागितली.

या प्रकरणी पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड झाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी गिरवलेंना अटक केली होती.

मात्र, अटक केल्यानंतर गिरवले यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गिरवले यांच्या पत्नीने केला. त्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

त्यावर गुरुवारी न्यायाधीश एम. जी. शिवलकर व टी. एन. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने गुन्हे शाखेचे १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

याप्रकरणी २७ मार्चला होणाऱ्या सुनावणीत या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे. गिरवले यांच्या पत्नीने काही पुरावे देखील न्यायालयासमोर सादर केलेले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. पुढील सुनावणीत हे पोलिस काय म्हणणे सादर करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment