शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या : आमदार मोनिका राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  जायकवाडी फुगवट्या खालील शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी धरणग्रस्त कृती समितीच्या बैठकीत दिला.

नवीन पाणी परवानगी व नूतनीकरणास शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जायकवाडी फुगवटा पाण्याची चोरी होत असलेली जनहित याचिका औरगांबाद खंडपीठात दाखल होऊन केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने बारा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या पाणी परवानगी नुतनीकरण अडचणी संदर्भात आमदार राजळे यांच्या उपस्थितीत आधिकारी व धरणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीस जायकवाडी फुगवटा शाखेचे उपअभियंता अविनाश पाडोंळे, दगडी धरण शाखा अभियंता राजाराम गायकवाड, कालवा निरीक्षक राजेंद्र दराडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब भोसले, वाय. डी. कोल्हे, भीमराज सागडे, कैलास सोनवणे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजळे यांनी पाणी परवान्यांची निश्चित कालमर्यादा अपेक्षित आहे. नवीन परवाना पद्धत याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशा अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment