राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / जामखेड :- जनतेच्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार व शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे, असा आरोप माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.महाविकास आघाडीच्या विरोधात जामखेड भाजपतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रा. शिंदे बोलत होते.

प्रा. शिंदे म्हणाले, अवकाळीग्रस्तांना प्रतिहेक्‍टर 25 हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्‍टर 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. पण सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही.

सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्‍गूल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. यावेळी डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, आदींची भाषणे झाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment