अहमदनगर जिल्ह्यात ‘अवकाळी’चा दणका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- थंडीचा महिना उलटून उबदार उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अवकाळी पावसाने रविवारी नगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली. काही भागात गारांचा मारा झाल्याने दाणादाण उडाली. 

शेवगाव आणि पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील विविध भागांत काल अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपिटही झाली. या आस्मानी संकटात गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा आणि संत्रा फळपिकांचे नुकसान झाले आहे.

या पावसाचा फटका खळ्यात मळ्यात उघड्यावर काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना बसला. हे पीक झाकण्यासाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. या नवीन संकटामुळे शेतकरी हबकून गेला आहे.

नगर शहर, भिंगार, नागरदेवळे यासह अन्य ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. त्यात गहू पिकाला फटका बसला.खरवंडी कासार वार्ताहराने कळविले की,- पाथर्डी शहरासह तालुक्यात झालेल्या रविवारच्या दुपारच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रविवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह सुसाट वार्‍याने आलेल्या गारा व पावसाने शेतकर्‍यांचे गहू, फळझाडे, कांदा, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रविवार रोजी सायंकाळी चार वाजता आलेल्या सोसाट्याच्या वार्‍याबरोबर तब्बल दीड तास तळ ठोकला. या दरम्यान गाराही कोसळल्या. त्यात गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment