सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील तृतीय पंथीय मतदारांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर शरसंधान साधले आहे

आम्ही सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग’, असा सवाल केला.

 ‘आता त्यांनी आमचे फोन घेणे सुद्धा बंद केले’, असा आरोप तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या काजल गुरु यांनी केला आहे.

 ते म्हणाले की, जर त्यांनी कामे केली नाहीत, तर पुढल्यावेळी आम्ही त्यांना मतदान करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सुजय विखे जेव्हा लोकसभा निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांची काही लोक आली व तुमची दफनविधी व घरकुलांची कामे करतो, असे आम्हाला आश्वासन दिले.

ते निवडून आता वर्ष होत आले. आम्ही त्यांना पत्र देऊन थकलो. पण आमचे कोणतेही काम मार्गी लागले नाही.

 सुजय विखे यांचा मी निषेध करते, असे ते म्हणाले. ‘तृतीयपंथीयांची कामे करू शकत नाही.

विखे हे फोन सुद्धा उचलत नाही. ते भेटत नाहीत. मी हे त्यांचे नाव घेऊन सांगते. कारण आम्ही कुणाला घाबरत नाही’, असेही त्यांनी सांगितले बोलताना सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment