उठाबशांची शिक्षा दिल्याने ते विद्यार्थी पडले आजारी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- विद्यार्थी गोंधळ घालतात म्हणून एका शिक्षिकेने तीन मुलांना दोनशे उठाबशा काढायला लावल्या. शिक्षिकेच्या या अघोरी शिक्षेने तिन्ही विद्यार्थी आजारी पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील पहुरजिरा येथील जिल्हा परिषद शाळेत २९ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पालकवर्ग संतप्त झाला असून, शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पडलेल्या मुलांची नावे आहेत.

पहुरजीरा येथील जि.प. प्राथमिक शाळेत हे विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकतात. तिन्ही विद्यार्थी २९ फेब्रुवारी रोजी धिंगाणा घालत असल्याचे दिसून आल्याने शिक्षिका मनीषा शेंबडे यांनी तिघांनाही दोनशे उठाबशा काढण्याची शिक्षा केली.

ज्ञानेश्वर पारस्कर हा रडतच ७० उठाबशा काढून कोसळला. यानंतर ओम तळपते व ज्ञानेश्वर उद्धव मेटांगे यांनी दोनशे उठाबशा काढल्या. घरी परतल्यानंतर तिन्ही विद्यार्थी आजारी पडले. मुलांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालक संतप्त झाले.

पाठ दुखीसोबतच हातपाय दुखू लागले. त्यांना जागेवरून उठताही येत नसल्याने तिन्ही मुलांना दवाखान्यात भरती करण्यात आले. शिक्षिका मनीषा शेंबडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात पालकांनी शिक्षणांधिकाऱ्यांसह संबंधितांकडे तक्रार केली आहे. यातील ओम हा विद्यार्थी अत्यवस्थ झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment