सरकार पाडण्याचे भाजपचे षड‌्यंत्र अयशस्वी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या सरकारला कोणताही धोका नसून ते पाडण्याचे भाजपचे षड‌्यंत्र निष्फळ ठरल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या आमदार रामबाई सिंह यांनी अपहरण आणि मारहाण झाल्याचा दावा फेटाळला आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, पक्षाचे प्रवक्ते विवेक तन्खा आणि माध्यम विभागप्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला यांनी गुरुवारी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की,

गेल्या पाच-सहा वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे तेव्हापासून राज्यांमधील लोकशाही संपवली जात आहे. यात अरुणाचल प्रदेशात निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. त्यानंतर मणिपूरमध्ये काँग्रेसचे बहुमत असलेले सरकार पाडण्यात आले.

गोव्यात काँग्रेसकडे असलेल्या बहुमताकडे दुर्लक्ष करण्यात येऊन त्यांना सरकार स्थापन करू दिले नाही. तसेच कर्नाटकमध्ये राज्यपालांनी काँग्रेसच्या बहुमताकडे दुर्लक्ष करत भाजपला शपथ दिली.आता भाजपने मध्य प्रदेशात प्रयत्न करून पाहिले, मात्र त्यात यश आले नाही. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी प्रसिद्धिपत्रक काढले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment