नियमित कर्जफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांवर अन्याय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना महा विकास आघाडीने सरकारने कर्जमाफी जाहीर केली परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

आघाडी सरकारने दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिली, परंतु  अनेक शेतकरी बांधव सोसायटीच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करीत आहोत.

अनेक शेतकरी आपली पत सांभाळण्यासाठी बँक गावातील सोसायटी थकित राहू नये आपली सामाजिक पत टिकवण्यासाठी जीवाचे रान करून पोटाला चिमटा काढून.

बायकापोरांची इच्छा मारून साठवलेले पैसे देऊन कमी पडत असतील तर बायकोचे दागिने गहाण ठेवून किंवा दागिने मोडून कर्ज फेडतात आणि परत आपल्या पोटाची खळगी व प्रपंच चालवण्यासाठी दुसरे कर्ज घेतात आणि ते दरवर्षी नियमित भरतात.

खरंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीदार सभासदां पेक्षा दुप्पट कर्ज माफी मिळायला हवी होती. परंतु मागील तीनही कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरकार कधी न्याय देणार, अशी भावना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment