अहमदनगर जिल्ह्यातील कर्जमुक्तीसाठी मिळाले ‘इतके’ कोटी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बळिराजाला दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली.

दरम्यान बुधवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ५२१ कर्जखात्यांसाठी १ हजार ४०१ कोटी ९२ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशात संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

२४ फेब्रुवारीला प्रायोगिक चाचणी झाल्यावर शनिवार दि. २९ फेब्रुवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील एक ५९८ गावांची कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या शाखा व आपले सरकार सेवा केंद्रात असलेल्या दोन हजार बायोमेट्रिक मशीनद्वारे आधार प्रमाणिकरणाचे काम निरंतर सुरू आहे.

शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येत असून, जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार २३३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण सुरू आहे.

बुधवारपर्यंत जिल्हा बँकेच्या २ लाख ७ हजार २८२ कर्जखात्यांसाठी १ हजार १८२ कोटी ८२ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली. तसेच इतर बँकांच्या २१ हजार २३९ कर्जखात्यांसाठी २१९ कोटी ११ लाख ६७ हजार रुपये रक्कम प्राप्त झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment