पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीनेही केली गळफास घेऊन आत्महत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे घडली.

पतीच्या विरहातून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. सदर तरुणीच्या पतीने बुधवारी औरंगाबाद येथे आत्महत्या केली होती.

पत्नीने स्वतःचे आयुष्य संपवले. एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (वय 22) व मिनाक्षी जाधव (वय 20) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता.

रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याने तो विवाहानंतर पत्नी मिनाक्षीसह औरंगाबाद येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.

दरम्यान बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नातेवाईक दुख:त असतानाच आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घरालगत  मिनाक्षी हिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment