खोटे लग्न लावून नवरीसह दलालही झाले ‘नॉट रिचेबल’ अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर ;- चार जणांनी संगनमत करून लग्न लावल्याचे भासवून दलालीची रक्कम घेऊन एका व्यापाऱ्याची सोन्या-चांदीच्या दागिन्यासह सुमारे ३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

‘बनावट नवरी’ प्रकरणानंतर आता दलाली घेऊन लग्न जमवणाऱ्यांकडूनही फसवणुकीचे प्रकार होत असल्याने खळबळ उडाली. फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रात अर्जात म्हटले आहे, आमच्या समाजात मुलींचे प्रमाण कमी असल्याने आपला विवाहासाठी आपले नातेवाईक यांनी प्रयत्न सुरू केले.

आपला चुलतभाऊ हा औरंगाबाद येथे रहात असल्याने त्यानेही प्रयत्न केले. ही माहिती आरोपींना माहिती झाल्यानंतर राहुल याने आपल्या भावास भेटून आपण दलाली घेऊन इच्छुक मुला मुलींचे लग्न लावून देत असल्याचे सांगितले व ३ लाख रुपये दलालीची मागणी केली.

लग्न करण्याच्या चांगल्या हेतूने १८ जानेवारीला रांजणगाव एमआयडीसी औरंगाबाद येथे आरोपींनी फिर्यादीला मुलगी दाखवली. १९ जानेवारी २०२० रोजी केशव गोविंद बनात लग्न लावण्याचे ठरवले. २ लाख २१ हजार रुपये राहुल व अश्विनी कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले.

१ लाख २५ हजार रुपयांचे नवरीला दागिने केले. लग्न समारंभ पार पडल्यानंतर दोन दिवस तिला औरंगाबाद येथे घेऊन जातो, नंतर पाठवू असे त्यांनी सांगितले. मात्र, नवरी परत नांदायला येत नव्हती. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सुमित कैलास पांडे (रा. बेलापूर रोड, वॉर्ड नंबर ७ श्रीरामपूर) यांनी दिलेल्या अर्जावरून आरोपी राहुल रजपूत ऊर्फ राहुल ऊर्फ कल्याण फकीरराव राऊत, नीता राहुल राऊत, (दोघे पुंडलिकनगर, औरंगाबाद), मेघा संजय कटारिया, अश्विनी कांबळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment