तबलिगी जमातने भारतीयांची जाहीर माफी मागायला हवी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पुणे : तबलिगी जमातच्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाच्या विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या या वर्तनामुळे धार्मिक तेढ वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे मुस्लिम समाजातही तबलिगींच्या वर्तनाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे तबलिगी जमातने भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन इथे भरविण्यात आलेल्या मरकजवरून देशात सध्या मोठ्या प्रमाणात वादंग उठले आहे. लॉकडाऊननंतरही मरकजच्या कार्यक्रमाला जवळपास १४०० लोक गेले होते.

त्यातील जवळपास १३०० जणांना क्वारंटाईन केले होते. त्यामुळे यातील अनेकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास तलबिगी जमातचा मरकज कार्यक्रम कारणीभूत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने एक पत्रक काढण्यात आले असून, यामध्ये तबलिगी जमातीवर जोरदार टीका होत आहे.

सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याबद्दल व कोरोनाच्या फैलावास कारण ठरल्याबद्दल तबलिगींनी माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment