कोरोनामुळे देशात भूकबळी जाण्याचा धोका वाढला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इस्लामाबाद : प्राणघातक कोरोनाने पाकिस्तानला घट्ट विळखा घातला आहे. त्यामुळे संकट आणखी वाढले असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी मदतीसाठी जगापुढे हात पसरले आहेत. आतापर्यंत घेतलेले कर्ज माफ करण्याचे साकडे त्यांनी घातले आहे.

लॉकडाऊनमुळे लाखो नागरिकांचा भूकबळी बळी जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यावरून पाकने कोरोनापुढे सपशेल गुडघे टेकल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकमध्ये कोरोनाचे ५४७७ रुग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंत ९५ जणांचा बळी गेला असून परिस्थिती आणखी भीषण होत चालली आहे. वैद्यकीय उपचारासाठीची यंत्रणा व उपकरणांचा देशात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान पुरते हतबल झाले आहेत.

आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे कर्जाच्या बाबतीत सवलत देण्याची मागणी त्यांनी जगाकडे केली आहे. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.

त्यामुळे पाकला आर्थिक मदत करण्यासाठी जगाने पुढाकार घेण्यासोबतच विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय समुदायाने मदतीचा हात देण्याची विनंती त्यांनी केली आहे. विशेष बाब अशी की, पाकची अर्थव्यवस्था अगोदरच गटांगळ्या खात आहे.

कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. म्हणून पंतप्रधान इम्रान खान आणखी मेटाकुटीला आले आहेत. पाकवर सध्या १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक कर्ज आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment