साडेबारा लाख कामगारांना मिळणार प्रत्येकी पाच हजार रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम :- देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांची मोठी अडचण होत आहे.

अशा स्थितीत या कामगारांना दिलासा देण्याच्या हेतूने राज्यातील नोंदणीकृत असलेल्या १२ लाख ३८ हजार कामगारांना दोन टप्प्यांत प्रत्येकी पाच हजार रुपये राज्य सरकारच्या वतीने दिले जातील.

त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे, अशी माहिती राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटींचे गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले आहे.

त्यातून महाराष्ट्रातील कामगारांसाठी एक रुपयाही मिळालेला नाही. राज्याच्या कामगार कल्याण महामंडळाकडे विविध उपकराच्या माध्यमातून जमा झालेले ३१ हजार कोटी रुपये आहेत.

त्यातून राज्यातील नोंदणीकृत १२ लाख ३८ हजार कामगारांना दोन टप्प्यांत पाच हजार रुपये देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment