कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यात आज पासून सुरू होणार :- बबनराव पाचपुते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा – कुकडचे आवर्तन लवकर सुटले होते मात्र उद्यापासून आपल्याकडे म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू होत आहे. पाणी सर्वाना मिळेल या बाबत कोठेही शंका नाही. सर्वांनी आपली काळजी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाचपुते यांनी म्हटले आहे की, ” आपल्याकडे आज पासून (दि. १७ एप्रिल) आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी लवकर सुटेल होते. मात्र आपल्याकडे येण्यास उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे.

या बाबत सल्लागार समितीच्या बैठकीत बोलू मात्र उद्यापासून सुटणारे पाणी सर्वांचे भरणे झाल्याशिवाय बंद करणार नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याना आपण ही वस्तुस्थिती सांगितली. येडगाव माणिकडोह चा प्रश्न वरिष्ठांच्या कानावर घातला आहे.

सर्वाना पाणी मिळेल हे नियोजन केले आहे.” पाण्याचा अपव्यय शेतकऱ्यांनी टाळावा. शिवाय कोरोना व्हारस चे मोठे संकट आपल्यावर डोईवर आहे. त्याचा ही विचार करून सर्वांनी आवर्तन काळात आपली काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भरणे करावे, असे ही पाचपुते यांनी म्हटले आहे.

आजपासून श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील चारी नं.१४, १३,१२,११,१० या चा-याना व १३२ लिंक कॅनाल पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे तसेच विसापूर मधील आवर्तना मधून काही प्रमाणात भरणे राहिलेले आहेत, बाकी विसापूर मधून सर्व भरणे काढण्यात आलेली आहेत. घोड चे आवर्तन हि पूर्ण होऊन घोड नदी मध्ये हि पाणी सोडण्यात आलेले आहे.त्याच बरोबर घोडेगाव चा पण प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे तसेच कुकडी आवर्तना मधून कि.मी ११० पासून वर ९० कि मी पर्यत वरचे सर्व भरणे होत आलेली आहेत – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment