रोहित पवारांच्या मतदारसंघात ८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24  :- कर्जत तालुक्यात आठ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावात टँकर सुरू करणे आवश्यक असल्याने सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पंचायत समितीमध्ये याबाबत आढावा घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना काही गावात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावात शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

याबाबत पंचायत समितीमधून विशेष प्रयत्न सुरू असून याबाबत कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याबरोबर चर्चा केली आहे.

कर्जत तालुक्यातील आठ गावात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने तेथे तातडीने टँकर सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. कोंभळी, करपडी, चांदे बु, रवळगाव, बहिरोबावाडी, गुरवपिंपरी, मुळेवाडी, चिंचोली काळदाते, या आठ गावात भीषण पाणीटंचाई आहे.

बहिरोबावाडी येथे टँकर सुरू झालेला असून कोंभळी, चांदे बु, गुरवपिंपरी, मुळेवाडी, चिंचोली काळदाते या पाच गावाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आहेत. रवळगाव, करपडी या दोन गावाचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment