राज्यात ६६ लाख ३१ हजार ९५० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई .दि. 27 :-  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 27 एप्रिल 2020 या सत्तावीस दिवसात  राज्यातील 1 कोटी 54 लाख 18 हजार 966 शिधापत्रिका धारकांना तब्बल 66 लाख 31 हजार 950 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा

उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशन कार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 34 हजार 870 क्विंटल गहू, 15 लाख 71 हजार 624 क्विंटल तांदूळ, तर  19 हजार 385 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 35 हजार 476 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 3 एप्रिलपासून एकूण 1 कोटी 31 लाख 10 हजार 81 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे.

या रेशनकार्ड वरील 5 कोटी 94 लाख 95 हजार 192 लोकसंख्येला 29 लाख 74 हजार 760 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 APL केसरी कार्ड धारक लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन 50 हजार 700 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

Leave a Comment