कालव्यात सोने गेले वाहून;तीन दिवसांनी पुन्हा आले ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-कुकडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका महिलेचे सोने पडले. प्रवाहाने ते वाहून गेले परंतु तीन दिवसांनी त्याच परिसरात ती सोन्याची पिशवी सापडल्याची घटना घडली आहे.

पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून जवळे, सांगवी सूर्या मार्गे पारनेरकडे वैशाली दामू औटी त्यांचा मुलगा दुचाकीवरुन बुधवारी दुपारी चालले होते. यावेळी ते दोघे माळवाडी येथील सिद्धेश्वर ओढ्यावरील असणाऱ्या पुलावरून जात होते.

यावेळी दुचाकीस्वाराचा तोल गेला. यामुळे वैशाली यांच्या हातातील पिशवी पाण्यात पडली. यावेळी कुकडीच्या कालव्याला पाणी वहात होते. यात ही पिशवी वाहून गेली.

सदर महिलेने तातडीने पाण्यात उडी घेतली परंतु ती पिशवी हात लागली नाही. वैशाली औटी यांनी तीन दिवसानंतर शनिवारी ज्याठिकाणी पिशवी गेली होती त्या परिसरात शोधाशोध केली.

यावेळी त्यांना जवळ असलेल्या बंधाऱ्यात तरंगताना पिशवी दिसली. ही पिशवी लोकांच्या मदतीने बाहेर काढली. त्यावेळी त्यात असणारी सोन्याचे दागिने असलेला डब्बा तसाच मिळाला. सदर महिलेने कर्मचारी नामदेव बरशिले व परिसरातील शेतक-यांचे आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment