‘त्या’ अधिकाऱ्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता करण्यातून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असावा.

त्यामुळे पुण्यातील अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

पुण्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी निधन झाले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की,

गायकवाड यांची साताऱ्यातून आठ महिन्‍यांपूर्वीच पुण्‍यात बदली झाली होती. मात्र चारच दिवसात त्‍यांची पुन्‍हा पिंपरी चिंचवड येथे अचानक बदली करण्यात आली. प्रशासनापुढे सध्‍या कोरोनाच्या संकटाचे मोठे आव्‍हान असताना ही बदली शंकास्पद आहे.

राज्‍य सरकारने सर्व बदल्‍यांना स्‍थगिती दिली असतानाही गायकवाड यांची बदली का करण्‍यात आली, याची चौकशी करावी, अशी मागणी करतानाच या बदल्यांमागे मोठे आर्थिक हितसंबध गुंतले असल्‍याची चर्चा महसूल विभागातूनच पुढे आली आहे.

या बदलीला गायकवाड यांनीच मॅटमध्‍ये दिलेल्‍या आव्‍हानाला स्‍थगितीही मिळाली होती. त्‍यामुळेच त्‍यांच्‍यावर कोणी दबाव आणला का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असेही विखे- पाटील म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment