महत्वाची बातमी : ‘त्यांना’ आता अहमदनगर मध्ये ‘नो एण्ट्री’ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लाॅकडाऊन शिथिल झाल्याने अनेक मजूर, नातेवाईक नगरमध्ये वास्तव्याला येत आहेत. परवानगी असेल, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. परवानगी असेल त्यांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जातील.

अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात १७ प्रभाग सुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह नगरसेवकांचाही समावेश आहे.

नगर जिल्हा ग्रीनझोनकडे वाटचाल करत असताना नव्याने आढळलेल्या सात बाधितांमुळे प्रशासन सतर्क झाले. प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.

ऊसतोड कामगार, परराज्यातील व्यक्ती, तसेच पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, भाविक, पर्यटक यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी १७ प्रभाग सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या समितीमध्ये प्रत्येक प्रभागातील चार नगरसेवक व आठ आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी या‌चा समावेश आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

प्रवेश देण्यापूर्वी तातडीने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. तपासणीनंतर क्वारंटाइनचा शिक्का मारून संबंधित व्यक्तीला मनपाच्या विलगीकरण कक्षात पाठवले जाणार आहे, अशी माहिती मिळाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment