भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे,

असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. भाजपतर्फे मंगळवारी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.

यावेळी मा खा दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, शामराव पिंपळे, विवेक नाईक, वंसत लोढा, सचिन पारखी आदि उपस्थित होते.

सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.

केंद्रसरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टिका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment