गाडी लावल्याचा रागातून बाप-लेकास तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- गाडी रस्त्याच्या कडेला लावल्याचा राग आल्याने चौघांनी नवनाथ साप्ते व त्यांच्या मुलावर जिवघेणा हल्ला केला. यामधे साप्ते व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. नगरच्या खासगी हाँस्पीटलमधे ते उपचार घेत आहेत.

यावेळी काही लोकांनी मध्यस्ती केली नसती तर अनर्थ घडला असता. या प्रकरणातील चौघे जण पसार झाले असून यामधील दोन जणांवर पहिलेच काही गुन्हे दाखल आहेत.

वाळुंज शिवारात रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी उभी केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादामधे शेळकेवस्ती येथे नवनाथ साप्ते व सचिन साप्ते यांच्यावर चौघांनी तलवार व सत्तुरने हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

साप्ते यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर चौघे जण पसार झाले आहेत. नवनाथ मोहन साप्ते यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली होती.

यावरुन अक्षय हरीभाऊ बेळगे (रा.वाळुंज), सचिन भाऊसाहेब काते (रा.सांगवी), प्रविण दिलीप गाडे( माळेगाव), प्रशांत काळोखे (रा.कसबापेठ, पाथर्डी) यांच्यात वाळुंज शिवारात गोरक्ष शेळके यांच्या वस्तीवर १३ मे रोजी तिन वाजता वाद झाला.

यावेळी झालेल्या मारामारीत नवनाथ साप्ते व सचिन साप्ते यांच्यावर वरील चौघांनी तलवार व सत्तुरने हल्ला केला. नवनाथ साप्ते व त्यांच्या मुलाला गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला. याबाबत नवनाथ साप्ते यांच्या जबाबावरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर जखमी करणे, शिवीगाळ करुन धमकी देणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे अशा कारणावरुन गुन्हा नोंदविला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment