पाहुण्यांमुळे अहमदनगर कोरोनामुक्त होऊ शकलेले नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. परंतु हा आजार शहरी भागात होता. ग्रामीण भागात याचा शिरकाव झालेला नव्हता ही समाधानकारक बाब होती.

परंतु मजुरांच्या स्थलांतरानंतर मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनेक गावांनी तर शहरातून आलेल्यांना गावाबाहेरच विलगीकरणाची सोय केली आहे.

नगर जिल्ह्य़ात कोरोनाग्रस्तांची संख्या ७५ झाली असून ती शंभरी पार करण्याची शक्यता आहे. बाहेरून येणाऱ्यांचे शाळा, महाविद्यालयात त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे;

पण त्यांना आता करोनाची बाधा झाली आहे.यात बहुतांश नातेवाईकांचाच समावेश आहे. या पाहुण्यांमुळे नगर करोनामुक्त होऊ शकलेले नाही.

दरम्यान राज्यातही अशीच स्थिती आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नागरिकांना आपापल्या गावांमध्ये परतण्यास परवानगी दिली आणि ग्रामीण भागांमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले.

करोनामुक्त झालेल्या गोव्यासारख्या राज्यातही स्थलांतरित आले आणि करोनाचे रुग्ण आढळले. केरळातही तेच झाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही चित्र वेगळे नाही.

मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांमधून गेलेल्यांमुळे ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. शहरी भागात राहणाऱ्यांना गावात परत जाण्याची ओढ लागली होती.

त्यांना रोखता येत नव्हते. यापुढील काळात जास्तीत जास्त खबरदारी घेणे आणि सरकारच्या सूचनांचे पालन करणे हेच आपल्या हाती आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment