क्वारंटाईन केलेले रात्री घरी झोपायला जातात,अहमदनगरच्या ‘या’ नेत्याने केले विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- क्वारंटाईन केलेले लोक फक्त म्हणण्यापुरतेच क्वारंटाईन झालेले आहेत. प्रत्यक्षात रात्री ते झोपायला आपापल्या घरी जातात, असे विधान खासदार सुजय विखे यांनी केले.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ. विखे बोलत होतो. त्यांनी डॉक्टर म्हणून सल्ला देत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासकीय गोष्टींवरही भाष्य केले.

कोल्हापूरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या जास्तीत जास्त चाचण्या घेतल्याने तेथे रुग्णांची संख्या एकदम वाढली. आपल्या नगर जिल्ह्यात आपण असा प्रकार केला नाही.

तसे केले तर रुग्णांचा आकडा वाढेल,’ असं ते म्हणाले. ‘करोनाला धाबरू नका असे सांगतानाच, मी एकुलता एक असूनही अशा वातावरणात बाहेर फिरतो आहे.

ज्यांना जगायचे आहे, त्यांनी स्वत: निर्बंध घालून फिरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. गर्दी आणि संपर्क टाळणे हाच करोनाची लागण रोखण्याचा प्रभावी उपाय आहे.

त्याच दृष्टिकोनातून देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळंच एखाद्याला करोनाची लक्षणे दिसल्यास त्याला तात्काळ क्वारंटाइन केले जाते.

साधारण १४ दिवस त्यानं इतरांपासून वेगळं राहावं हा उद्देश त्यामागे असतो. ग्रामीण भागात अशा प्रकारे अनेकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment