२० वर्षांनंतर ‘या’ चारींमधून वाहिले पाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : श्रीरामपूर-गोंडेगाव परिसरातील चारी क्रमांक १९ व २० मधून मागील २० ते २५ वर्षांपासून पाणी वाहने बंद आहे. या चारीवर असणारी सिंचन सुविधा बिघडल्याने पाणीही बंद होते.

परंतु आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नाने ते पुन:श्च सुरू झाल्याने २० वर्षानंतर या चरीतून पाणी वाहिले. यामध्ये प्रामुख्याने मातुलठाण, नायगाव, गोंडेगाव, जाफराबाद या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या चाऱ्यांची मोठे प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली.

या चारीतून आवर्तन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्यामध्ये यामुळे समाधानाचे वातावरण असून आमदारांच्या भेटीच्या वेळी अनेक शेतकर्यांनी धन्यवाद दिले.

विशेष प्रयत्नामुळे या चारीचे अंदाजे १५ किमी चारीचे काम या आवर्तानापूर्वी पूर्ण करण्यात आले. आज त्याची प्रत्यक्ष पाहणी आमदार लहू कानडे यांनी केली.

त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी सभापती सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment