…तर ‘त्यांनी’ सरकारमधून बाहेर पडावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  ‘सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही. या सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विचारले जात नाही. तरीही काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.

त्यांच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्ता सोडून सरकारमधून बाहेर पडावे. असे आव्हान माजी मंत्री तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची नाराजी आणि त्यानंतर त्यावर पडलेला पडदा, या संबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील बोलत होते.

त्यांचे पारंपरिक राजकीय स्पर्धक बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उद्देशून त्यांनी ही टीका केली. विशेष म्हणजे कुरबुरी सुरू असताना विखे पाटील यांनी या वादावर भाष्य करणे टाळले होते.

विखे पाटील म्हणाले सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या पक्षाच्या मुखपत्रातून कुरकुरणारी जुनी खाट अशा शब्दांत खिल्ली उडवली तरी काँग्रेस नेतृत्वाला काहीही वाटत नाही.

एवढे सर्व होऊनही आम्ही समाधानी आहोत असे जर ते म्हणत असतील तर तो एक मोठा विनोद आहे किंवा मग ते सत्तेसाठी लाचार आहेत, असे म्हणावे लागेल. एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाही.’

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment