कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  मागील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सदरील संक्रमण रोखण्यासाठी किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू तर कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक आहे.

शहरातील बाजारपेठा चालू असल्याने गर्दीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसाचा जनता कर्फ्यू व लॉकडाऊन पुकारुन, बाजारपेठा बंद करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, रोहिणी पवार, मिनाक्षी साळवे, जया वाळेकर, रोहिणी वाघीरे आदि उपस्थित होत्या.

कोरोनाचे संसर्ग अटोक्यात येई पर्यंत बाजारपेठ बंद ठेवाव्या, किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू व संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन पाळावा,

मुंबई, पुणे इतर ठिकाणाहून नगर जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांवर प्रतिबंध करावे, सरकारी कार्यालय व जीवनावश्यक वस्तूच्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्स ठेवण्यास सक्ती करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment