‘त्यांच्या’ टोलवाटोलवीत नागरिकांच्या जीवितास धोका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : नागरिकांच्या जीवितास धोका असताना देखील अधिकारी व पदाधिकारी केवळ एकेमेकांवर जबाबदारी टोलवाटोलवीतच धान्यता मानत असल्याचे चित्र श्रीरामपूर शहरात दिसत आहे.

काल गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला घेवून कोपरगावकडून एक रुग्णवाहिका गोंधवणीपर्यंत आली. परंतु कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गोंधवणीचा भाग सील केला आहे.

रुग्णाला तातडीने घेवून जाणे गरजेचे असल्यामुळे तेथील लोखंडी पाईप काढण्यासाठी काहीजण गेले असता, त्या पाईपमध्ये वीजप्रवाह उतरल्यामुळे चारपाच लोकांना त्याचा झटका बसला.

ही बाब वेळीच लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. याबाबत माहिती दिली असता अधिकारी व पदाधिकार्‍यांनी एकमेकांवर जबाबदारी टोलवाटोलवी केली .

याबाबत सविस्तर असे की, गोंधवणी शिवारात कोरोना बाधीत रुग्ण सापडल्याने गोंधवणी परीसर सील केला आहे. काल कोपरगावकडून रुग्ण घेवून रुग्णवाहिका गोंधवणीपर्यंत पोहोचली.

परंंतु परिसर सील असल्याने रस्ता बंद होता; परंतु रुग्णाला घेवून रुग्णवाहिका जाणे आवश्यक होते. तेथील नागरिकांनी पाईप काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पाईपमध्ये वीज प्रवाह उतरलेला होता.

हे माहिती भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे यांनी प्रांंताधिकार्‍यांंना सांगण्यासाठी फोन केला त्यांचा मोबाईल बंद होता. तहसीलदाशी संपर्क केला असता मी अधिकार्‍यांना सांगतो असे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेत फोन केला तर हे पोलिसांचे काम आहे असे उत्तर मिळाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना सांगितले. नंतर पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनि हा वीजप्रवाह बंद करून रस्ता मोकळा केला.

कोपरगावकडून माल घेवून येणार्‍या नवीन वाहन चालकांना गोंधवणी पासून श्रीरामपूर शहरात जाणारा पर्यायी रस्ता माहीत नसल्याने रस्ता काही जणांनी दाखविण्यासाठी पैसे कमविण्याचा नवीन धंदा सुरु केला आहे.

त्यामुळे श्रीरामपूर-पुणतांबा या मुख्य रस्ता बंद करण्याऐवजी केवळ रुग्ण आढळलेला भागच बंद करावा अशी मागणी होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment