हसन मुश्रीफ म्हणाले ‘या’ महिन्यापर्यंत जग कोरोनामुक्त होणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नोव्हेंबरपर्यंत जग करोनामुक्त होईल असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज (9 जुलै) अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर दौऱ्यावर आले होते.यावेळी ते बोलत होते. सप्टेंबरपर्यंत करोना रूग्ण संख्या कमी होईल.

नोंव्हेबरपर्यंत जग करोना मुक्त होईल असा विश्वास वाटतो असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

संगमनेरमध्ये करोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये करोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरमध्ये आढावा बैठक घेतली.

यावेळी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढविण्या सोबत टेस्ट वाढविण्याचे आदेश पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment